बुधवार, ३ जून, २००९

जर लक्षात आले असते तर......

आई चे स्थान अतिशय उच्च आहेच पण कधी कधी बघा कसे मनांत विचार उचंबळून येतात- तुमच्या आमच्या सारख्या सामान्यांच्या मनांत..

जीवनाच्या एका वळणावर पोहोचल्यावर मागे वळून बघता.....साधारण व्यक्तिच्या मनांत येणारी ही गोष्ट आहे....
घरोघरी घडणारी पण....काळ जातो...वेळ निघून जाते...हातात काही नाही...


जेंव्हा मी चार वर्षाचा होतो तेंव्हा- 'माझी आई माझे सर्वस्व आहे.... शी इज द बेस्ट!!'
आठ वर्षांचा झालो तेंव्हा मित्रांमधे आई चे स्थान उंचावरच - 'माझ्या आई ला सगळे काही येते हं...काय वाटले तुला यार....'

बारा वर्षाचा होता होता - 'माझी आई ना मला समजूनच घेत नाही बघ...'
जेंव्हा पंधरा वर्षाचा झालो - 'माझी आई मला सगळ्या ठिकाणी टोकतच राहते, अजिबात काही करूच देत नाही..'

अठरा वर्षाचा वाढदिवस झाल्या झाल्याच - 'कमॉन आई, आता मी कायद्याने सज्ञान म्हणवला जातो हां, माझ्या मधे मधे केले नाहीस तर नाही का चालणार तुला...'

पंचवीस वर्षाचा झालो तर सल्ले मिळू लागलेत - 'काही पण करण्याच्या आधी जर एकदा आईला विचारशील तर बरे होईल नं..'

पन्नाशी गाठतांना वाटले होते.- 'आई समोर नाहीये पण असती तर आज ह्या गोष्टीवर आईचे म्हणणे काय राहीले असते काय माहीत..'

आज माझी सत्तरी येण्यात आहे...वाटतेय - 'आज आई राहीली असती तर.....'

आई समोर असतांना गृहित धरलेच जात नाही...विचारही होत नाही तिच्याबद्दल..पण ती मात्र करत झिजतच राहते सगळ्यांसाठी... जेंव्हा महत्व कळते तोपर्यंत नको तितका काळ लोटलेला आहे हे लक्षांत येते....आहे ना...

दीपिका 'संध्या'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: