शनिवार, २० जून, २००९

नको दुरावा...

मौनाचा कोलाहल आता सोसवेना
एकांताचा आकांत आता सोसवेना

व्यर्थता आहे आज जागण्यात ही
स्वगत माझे मलाच आता ऐकवेना

नाही धरबंध ह्या बोलण्या हसण्याला
स्वप्नांचा पसारा पण आता आवरेना

बेधुंद रोज रात्री आठवांत तुझिया
नयनी अश्रुंना शांत आता बसवेना

धरी हात घट्ट हातात सोडू नको
विरह अन हुरहुर आता पेलवेना

बकुळीच्या फुलांनी सजव रानवाटा
ठेचाळत काट्यांवरी आता चालवेना

दीपिका 'संध्या'

४ टिप्पण्या:

bhaanasa म्हणाले...

मौनाचा कोलाहल आता सोसवेना
एकांताचा आकांत आता सोसवेना.... अप्रतिम.

shrikrishna म्हणाले...

सूंदर कविता लिहिली आहे.वाचून बरं वाटलं.

दीपिका जोशी 'संध्या' म्हणाले...

धन्यवाद....

vivek म्हणाले...

छान कविता. तुमचा हा पैलू मला माहितच नव्हता. अजून येऊद्यात